१९८४ च्या फेब्रुवारी महिन्यात माझा विद्यर्थी परिषदेशी संपर्क आला.
त्याच दरम्यान दापके सरांचाही संपर्क आला, पहिली भेट अशी संस्मरणीय झाली असे नाही. पण हळु हळु स्नेह वढत गेला. परिचयाचे रुपांतर ॠणानुबंधात झाले ते कळलेच नाही. सर काल गेले आणि पटकन माझ्या डोळ्या समोरुन एक पट सरत गेला. सरांचे धिप्पड व्यक्तिमत्व, सरांची ऐतिहासिक टी.वी.एस. ५० गाडी, वरुणतीर्थ मैदानाच्या व्यायाम शाळेत व्यायाम करणारे सर, व्यायाम करताना सीटप्स काढताना पाय धरुन मदत करणरे सर, गप्पा मारताना टाळी मागणारे सर, एका विशिष्ठ स्वरात "बरं का" म्हणून विषयाची सुरवात करणारे सर, मिलिंद कौलगुडला किती चढत्या उतरुन आलास विचारणरे सर..... ज्यनि सरांबरओबर अधिक काळ काम केले आहे ते अशा अनेक आठवणी सांगतील...किंवा वाचताना त्यांच्या समोर सरांचे व्यक्तिमत्व नक्कीच उभे रहिले असेल.
तसे सर आताच्या लतूर जिल्ह्यतील अहमद्पुर गावचे, नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरला आले आणि कोल्हापुरकर झाले. तसे अनेक जण आले असतील पण सरांच परिचय येथे संपत नाही तर सुरु होतो.सुमारे १९६६च्या दरम्यान सर परिषदेच्या संपर्कात आले. कोल्हापुरात त्या काळात असणारी जातीविषयक समिकरणे पहाता ब्राम्हणेत्तर कार्यकरता मिळणे आणि तो टिकणे सोपे नव्हते. त्यात सर ज्या माहाविद्यालयात शिकवत होते ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पा कुंभार यांचे, त्यामुळे परिषदेचे काम करणे सोपे नव्हते. एकदा तर रत्नाप्पाअण्णानीं सराना बोलावुन सांगितले की एक तर नोकरी करा किंवा परिषदेचे काम करा. सर्वसामावेशक परिषदेचा चेहरा बनविण्यात सरांचा मोठा सहभाग होता.
१९८४ साली नाशिक येथील प्रांत अधिवेशनात सर प्रदेशाध्यक्ष झाले. प्रा. अनिरुध्द देशापांडे याच्या सारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वा नंतर ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सरानीं स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा उभी केली. सरांचे सत्र, भाषणे नेहमी काही तरी वेगळे देणारे असे, त्याच्या भाषणात येणारी उदाहरणे नेहमी थोडी हटके असत. मला अजुनही त्यांचे एक वाक्य आठवते “There is total moral decay “ कुठल्याशा विषयात सगळीकडेच कसे नैतिक अध:पतन झाले आहे या संदर्भातले हे वाक्य सर अनेकदा वापरत.सुमारे ४-५ वर्षे सर प्रदेशाध्यक्ष राहिले.१९९५ साली युती शासनानाच्या काळात सर राज्यपाल नियुक्त आमदार झाले.
दरम्यानच्या काळात सरांचे दिसणे कमी होत गेले. गेली काही वर्षे ते आम्हाला आवाजावरुन ओळखत असत. काळाच्या ओघात भेटण्यातील सातत्य कमी होत गेले. सुमारे २ महिन्या पुर्वी एस. जी. कुलकर्णी सरांकडे सर अम्हा सगळ्याना भेटले. "यारे जर सगळे जण, जरा वेळ काढुन या, भरपुर गप्पा मारु या. नाही तर असे करा आपण शेतावर जेवायचा कार्य़क्रम करु या, सांगा कधी येता?" असे प्रेमाचे अग्रहाचे निमंत्रण सरांनी दिले पण नियतीच्या मनात वेगळेच होते.सुमारे महिन्याभरात सरांचे अचानक वजन कमी होउ लागले.२५ किलो मात्र १५ दिवसात कमी झाले, वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि निदान कॅन्सरचे झाले, लिव्हरचा कॅन्सर आणि शेवटचा टप्पा. १५ दिवसांपुर्वी आम्ही सगळे जण (सतीश, नंदू, विद्यधर, प्रसन्न, वगैरे) सरांशी गप्पा मारुन आलो, पहाडी असणारा आवाज आता जरा क्षीण झाला होता. सुमारे दीड, दोन तास सर आमच्य्या बरोबर जुन्या आठवणीत रमले होते. बोलताना टाळ्या मागत होते. डॉक्टरानीं ६ महिने ते वर्षाचा वेळ सांगितला होता, परत भेटण्याचे ठरवुन आम्ही बाहेर पडलो ते पुन्हा सरांना न भेटण्यासाठी.....
त्याच दरम्यान दापके सरांचाही संपर्क आला, पहिली भेट अशी संस्मरणीय झाली असे नाही. पण हळु हळु स्नेह वढत गेला. परिचयाचे रुपांतर ॠणानुबंधात झाले ते कळलेच नाही. सर काल गेले आणि पटकन माझ्या डोळ्या समोरुन एक पट सरत गेला. सरांचे धिप्पड व्यक्तिमत्व, सरांची ऐतिहासिक टी.वी.एस. ५० गाडी, वरुणतीर्थ मैदानाच्या व्यायाम शाळेत व्यायाम करणारे सर, व्यायाम करताना सीटप्स काढताना पाय धरुन मदत करणरे सर, गप्पा मारताना टाळी मागणारे सर, एका विशिष्ठ स्वरात "बरं का" म्हणून विषयाची सुरवात करणारे सर, मिलिंद कौलगुडला किती चढत्या उतरुन आलास विचारणरे सर..... ज्यनि सरांबरओबर अधिक काळ काम केले आहे ते अशा अनेक आठवणी सांगतील...किंवा वाचताना त्यांच्या समोर सरांचे व्यक्तिमत्व नक्कीच उभे रहिले असेल.
तसे सर आताच्या लतूर जिल्ह्यतील अहमद्पुर गावचे, नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरला आले आणि कोल्हापुरकर झाले. तसे अनेक जण आले असतील पण सरांच परिचय येथे संपत नाही तर सुरु होतो.सुमारे १९६६च्या दरम्यान सर परिषदेच्या संपर्कात आले. कोल्हापुरात त्या काळात असणारी जातीविषयक समिकरणे पहाता ब्राम्हणेत्तर कार्यकरता मिळणे आणि तो टिकणे सोपे नव्हते. त्यात सर ज्या माहाविद्यालयात शिकवत होते ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पा कुंभार यांचे, त्यामुळे परिषदेचे काम करणे सोपे नव्हते. एकदा तर रत्नाप्पाअण्णानीं सराना बोलावुन सांगितले की एक तर नोकरी करा किंवा परिषदेचे काम करा. सर्वसामावेशक परिषदेचा चेहरा बनविण्यात सरांचा मोठा सहभाग होता.
१९८४ साली नाशिक येथील प्रांत अधिवेशनात सर प्रदेशाध्यक्ष झाले. प्रा. अनिरुध्द देशापांडे याच्या सारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वा नंतर ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सरानीं स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा उभी केली. सरांचे सत्र, भाषणे नेहमी काही तरी वेगळे देणारे असे, त्याच्या भाषणात येणारी उदाहरणे नेहमी थोडी हटके असत. मला अजुनही त्यांचे एक वाक्य आठवते “There is total moral decay “ कुठल्याशा विषयात सगळीकडेच कसे नैतिक अध:पतन झाले आहे या संदर्भातले हे वाक्य सर अनेकदा वापरत.सुमारे ४-५ वर्षे सर प्रदेशाध्यक्ष राहिले.१९९५ साली युती शासनानाच्या काळात सर राज्यपाल नियुक्त आमदार झाले.
दरम्यानच्या काळात सरांचे दिसणे कमी होत गेले. गेली काही वर्षे ते आम्हाला आवाजावरुन ओळखत असत. काळाच्या ओघात भेटण्यातील सातत्य कमी होत गेले. सुमारे २ महिन्या पुर्वी एस. जी. कुलकर्णी सरांकडे सर अम्हा सगळ्याना भेटले. "यारे जर सगळे जण, जरा वेळ काढुन या, भरपुर गप्पा मारु या. नाही तर असे करा आपण शेतावर जेवायचा कार्य़क्रम करु या, सांगा कधी येता?" असे प्रेमाचे अग्रहाचे निमंत्रण सरांनी दिले पण नियतीच्या मनात वेगळेच होते.सुमारे महिन्याभरात सरांचे अचानक वजन कमी होउ लागले.२५ किलो मात्र १५ दिवसात कमी झाले, वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि निदान कॅन्सरचे झाले, लिव्हरचा कॅन्सर आणि शेवटचा टप्पा. १५ दिवसांपुर्वी आम्ही सगळे जण (सतीश, नंदू, विद्यधर, प्रसन्न, वगैरे) सरांशी गप्पा मारुन आलो, पहाडी असणारा आवाज आता जरा क्षीण झाला होता. सुमारे दीड, दोन तास सर आमच्य्या बरोबर जुन्या आठवणीत रमले होते. बोलताना टाळ्या मागत होते. डॉक्टरानीं ६ महिने ते वर्षाचा वेळ सांगितला होता, परत भेटण्याचे ठरवुन आम्ही बाहेर पडलो ते पुन्हा सरांना न भेटण्यासाठी.....
No comments:
Post a Comment