Thursday, March 1, 2012

सुभाष बाबाराव दापके

१९८४ च्या फेब्रुवारी महिन्यात माझा विद्यर्थी परिषदेशी संपर्क आला.

त्याच दरम्यान दापके सरांचाही संपर्क आला, पहिली भेट अशी संस्मरणीय झाली असे नाही. पण हळु हळु स्नेह वढत गेला. परिचयाचे रुपांतर ॠणानुबंधात झाले ते कळलेच नाही. सर काल गेले आणि पटकन माझ्या डोळ्या समोरुन एक पट सरत गेला. सरांचे धिप्पड व्यक्तिमत्व, सरांची ऐतिहासिक टी.वी.एस. ५० गाडी, वरुणतीर्थ मैदानाच्या व्यायाम शाळेत व्यायाम करणारे सर, व्यायाम करताना सीटप्स काढताना पाय धरुन मदत करणरे सर, गप्पा मारताना टाळी मागणारे सर, एका विशिष्ठ स्वरात "बरं का" म्हणून विषयाची सुरवात करणारे सर, मिलिंद कौलगुडला किती चढत्या उतरुन आलास विचारणरे सर..... ज्यनि सरांबरओबर अधिक काळ काम केले आहे ते अशा अनेक आठवणी सांगतील...किंवा वाचताना त्यांच्या समोर सरांचे व्यक्तिमत्व नक्कीच उभे रहिले असेल.



तसे सर आताच्या लतूर जिल्ह्यतील अहमद्पुर गावचे, नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरला आले आणि कोल्हापुरकर झाले. तसे अनेक जण आले असतील पण सरांच परिचय येथे संपत नाही तर सुरु होतो.सुमारे १९६६च्या दरम्यान सर परिषदेच्या संपर्कात आले. कोल्हापुरात त्या काळात असणारी जातीविषयक समिकरणे पहाता ब्राम्हणेत्तर कार्यकरता मिळणे आणि तो टिकणे सोपे नव्हते. त्यात सर ज्या माहाविद्यालयात शिकवत होते ते कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पा कुंभार यांचे, त्यामुळे परिषदेचे काम करणे सोपे नव्हते. एकदा तर रत्नाप्पाअण्णानीं सराना बोलावुन सांगितले की एक तर नोकरी करा किंवा परिषदेचे काम करा. सर्वसामावेशक परिषदेचा चेहरा बनविण्यात सरांचा मोठा सहभाग होता.



१९८४ साली नाशिक येथील प्रांत अधिवेशनात सर प्रदेशाध्यक्ष झाले. प्रा. अनिरुध्द देशापांडे याच्या सारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वा नंतर ही जबाबदारी सोपी नव्हती. पण सरानीं स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा उभी केली. सरांचे सत्र, भाषणे नेहमी काही तरी वेगळे देणारे असे, त्याच्या भाषणात येणारी उदाहरणे नेहमी थोडी हटके असत. मला अजुनही त्यांचे एक वाक्य आठवते “There is total moral decay “ कुठल्याशा विषयात सगळीकडेच कसे नैतिक अध:पतन झाले आहे या संदर्भातले हे वाक्य सर अनेकदा वापरत.सुमारे ४-५ वर्षे सर प्रदेशाध्यक्ष राहिले.१९९५ साली युती शासनानाच्या काळात सर राज्यपाल नियुक्त आमदार झाले.



दरम्यानच्या काळात सरांचे दिसणे कमी होत गेले. गेली काही वर्षे ते आम्हाला आवाजावरुन ओळखत असत. काळाच्या ओघात भेटण्यातील सातत्य कमी होत गेले. सुमारे २ महिन्या पुर्वी एस. जी. कुलकर्णी सरांकडे सर अम्हा सगळ्याना भेटले. "यारे जर सगळे जण, जरा वेळ काढुन या, भरपुर गप्पा मारु या. नाही तर असे करा आपण शेतावर जेवायचा कार्य़क्रम करु या, सांगा कधी येता?" असे प्रेमाचे अग्रहाचे निमंत्रण सरांनी दिले पण नियतीच्या मनात वेगळेच होते.सुमारे महिन्याभरात सरांचे अचानक वजन कमी होउ लागले.२५ किलो मात्र १५ दिवसात कमी झाले, वैद्यकीय तपासण्या झाल्या आणि निदान कॅन्सरचे झाले, लिव्हरचा कॅन्सर आणि शेवटचा टप्पा. १५ दिवसांपुर्वी आम्ही सगळे जण (सतीश, नंदू, विद्यधर, प्रसन्न, वगैरे) सरांशी गप्पा मारुन आलो, पहाडी असणारा आवाज आता जरा क्षीण झाला होता. सुमारे दीड, दोन तास सर आमच्य्या बरोबर जुन्या आठवणीत रमले होते. बोलताना टाळ्या मागत होते. डॉक्टरानीं ६ महिने ते वर्षाचा वेळ सांगितला होता, परत भेटण्याचे ठरवुन आम्ही बाहेर पडलो ते पुन्हा सरांना न भेटण्यासाठी.....

२९ फेब्रुवरी.....

२९ फेब्रुवरी तारखेत नविन ते काय? लिप इयर आहे, ४ वर्षातून एकदाच येते आणि काही?

माहिती नाही.....

पण माझ्यासाठी मात्र ही एक स्पेशल आहे. अशाच एका २९ फेब्रुवरीला मी एका वेगळ्या प्रवासाला सुरवात केली होती. खरे तर या ग्रुप मधल्या बहुतेकानी हा मार्ग कधी न कधी चोखळला आहेच.

२९ फेब्रुवरी १९९२ चा दिवस अजूनही माझ्या पूर्ण स्मरणात आहे. पहाटे ४च्या सुमारस उठलो. रात्रीचा मुक्काम ३ मार्बल वर होता. पट पट आवरले, तो पर्यंत दादा पाटीलही आवरून तयार झाला होता. धावत पळत मुंबई सेन्ट्रल गाठले, "खरेतर मी तुझ्या बरोबर येणार होतो पण ते शक्य नाही तेव्हा तू एकटाच अहमदाबादला जा." इती दादा...स्टेशनवर (अहमदाबाद) बुकिंग खिडकी पाशी कुणी तरी कार्यकर्ता परिषदेची डायरी घेऊन उभा असेल, तो तुला कार्यालयात घेऊन जाईल आणि आज पासून तुझे कार्यक्षेत्र अहमदाबाद म्हणजे कर्णावती असेल..." पूर्व योजना, पूर्ण योजने प्रमाणे माझे आरक्षाण झाले नव्हते पण दादाने कुठून तरी एजंट कडून तिकीट मिळवले होते.बरोबर रु. २०० दादाने दिले ब्लॅक मनी....

५.४५ झाले गाडी हलली आणि माझा प्रवास सुरु झाला.सहप्रवासी बहुतेक गुजरातीच होते. त्यात एक मोठी कच्छी कुटुम्ब होते. दादर यायच्या आत त्यांनी डबे सोडले होते. कुटुंबातील महिला डब्यातील पदार्थ काढून सर्वांना वाटत होत्या. कानावर सारखे गुजरती संभाषण पडत होते. कधी थोडेसे समजत होते, कधी डोक्यावरून जात होते. आणि याच भाषेवर मला प्रभुत्व मिळवायचे होते. जे सह प्रवासी मला परके वाटत होते मला त्यांच्यातलाच एक बनायचे होते.गाडी वेगाने पळत होती आणि माझे विचारही. खरे तर माझ्या बरोबरीने १०-१२ जण पूर्णवेळ निघाले पण मी एकटाच महाराष्ट्रा बाहेर का? माझ्यात काही जादा गुण आहेत की काही कंमी आहे म्हणून मला गुजरतमधे पाठवले आहे....माझा निभाव लागेल ना? इत्यादी....

वापी, सुरत, बडोदा करत गाडी एकदाची अहमदाबाद्ला पोहोचली. दुपार उलटून गेली होती. उन्हाळा सुरु झाला होता. अहमदाबाद स्टेशनवर उतरलो. वातारणात एक प्रकारचा सुस्तपणा भरला होता. (अनेकदा स्टेशन, स्टॅन्डवर उत्साही वातवरण असते) बुकिंग खिडकी पाशी तिघेजण उभे होते. एकाच्या हातात परिषदेची डायरी. तो होता विजेन्द्र पांडे कर्णावती शाखा सहमंत्री, शहर उपाध्यक्ष म्रुगेशभाई शुक्ल, आणि प्रदेश सह्संगठनमंत्री अतुलभाई कोठारी. म्रुगेशभाईच्या व्हेस्पा १५० वर बसून परिषद कार्यालय गाठले. कांतीलालच्या गाडीवरचा चहा मागवला. येणारी काही वर्षे हाच कडक आणि मीठा चहा मला साथ देणार होता. संध्याकाळी रुद्रेशभाई व्यास (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारा)आणि आरतीबेनची (माझ्या आधिपासून विद्यार्थी विस्तारक म्हणून काम करणारी) ओळख झाली. रात्री म्रुगेशभाई कडे माझे आणि अतुलभाईची भोजन व्यवस्था होती.

पहाटे लवकर उठल्याने आणि दिवसभर प्रवासाने काहीसा क्षीण आला होता. कार्यालयातल्या सतरंजीवर आडवा होऊन कधी झोपलो ते कळलेच नाही.

आज या गोष्टीला २० वर्षे झाली. पण अजूनही काल परवा घडल्या सारखी वाटते. सहज आठवले म्हणून शेअर केले.