Sunday, September 4, 2011

मग यांच्यासाठी लोकपाल कोण?


दि. १५ /०४ रोजी मी मुंबईहून कोल्हापूरला येत होतो..
छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून दु.२ ची चेन्नई एक्सप्रेस पकडायची होती.
१४ नं. फलाटावर घाई घाईत पोहोचलो, जेवण व्हायचे होते, म्हटले तेथीलच एखाद्या स्टोलवरून काहीतरी घेऊन खाऊ....
प्रत्येकजण इथे लुटायला बसला होता....
१० रु चे व्हेज  sandwich त्यावरील स्टीकर काढून १५ रुपायाला विकत होते. २४ रु. छापील किमत असलेली पेप्सी वगैरेची बाटली बिनधास्त ३० रुपयाला विकत होते.....

६ वाजता पुण्याला पोहोचलो, आता बस पकडून कोल्हापूर गाठायचे तर स्वारगेट वरती लुटणारे विक्रेते हाजर होतेच... किस्सा मागील पानावरून पुढे सुरु होताच...१५ रु. छापील किमतीची पाण्याची बाटली २० रुपयाला.....

बस हायवे वर एका धाब्यावर थांबली. एस. टी. महामंडळाची बस... वाहक, चालकाचे फुकट जेवण, इतरांना चांगलेच महाग पडले होते. सर्व पदार्थ दीडपट किमतीला...
ज्यावर छापील किमत होती तेही २-५ रुपये महाग....... बस रात्री ११ नंतर कोल्हापूरला पोहोचणार असल्याने सर्व प्रवाश्यांना मजबुरीने महाग जेवण, खाणे घेणे भाग होते....

११.४५ वाजता कोल्हापुरात पोहोचलो. रिक्षावाला जवळचे प्रवासी घ्यायला तयार नाही ....१२-१३ रुपये मीटर होणारे अंतरास २५ रुपये मागत होता......

मनात प्रश्न आला "दिवसभरात मला भेटलेले हे सर्व भ्रष्टाचारी नाहीत का?" अवैध मार्गाने संपत्ती मिळवणे म्हणजे भ्रष्टाचार." ही व्याख्या बरोबर असेल तर इथे सर्वांनाच ती लागू पडते..
मग यांच्यासाठी लोकपाल कोण?

No comments:

Post a Comment